ई – बस वरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने १७ वाहनांना धडक; ६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : उत्तर प्रदेश ( Uttar Pradesh) मधील कानपूर (Kanpur) येथे रविवारी रात्री भीषण अपघाताची (Terrible accident) घटना घडली आहे. या अपघातात एका बसने तब्बल १७ वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. तसेच जखमींना उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील टाटमिल चौकात या ई- बसचे (E-bus) नियंत्रण सुटल्याने ती एकापाठोपाठ एक अशा १७ गाड्यांवर जाऊन धडकली. त्यानंतर, ड्रायव्हरने घटनास्थळावरुन पलायन केले असून ई बसची जबाबदारी आणि मेन्टेनन्सचे चालन करणाऱ्या पीएमआय एजन्सीने घटनेबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

तसेच हॅरिसगंज रेल्वे पुलावरुन उतरताच या ई-बसने कृष्णा हॉस्पीटलजवळून राँग साईडने धावायला सुरूवात केली होती. त्यात, बसने 2 कार, 10 दुचाकी, 2 ई-रिक्षा आणि 3 टेम्पोला धडक देऊन टाटमिलकडे पुढे जात होती. या घटनांमुळे रस्त्यावर मोठा जनकल्लोळ झाला. यांनतर टाटमिल येथे एका डंपरला बसने जोराची धडक दिली. त्यानंतर, चालकाने धूम ठोकली आहे.

दरम्यान, मृत पावलेल्यांपैकी तिघांची ओळख पटली आहे. तर इतरांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. शुभम सोनकर, ट्विंकल सोनकर, अरसलान यांची ओळख पटली आहे. जखमींवर टाटमिल येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणि हैलट रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी घटनेची दखल घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!