आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सर्वात मोठा निर्णय म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय.
विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता राज्यामध्ये मद्य महागणार आहे. त्याचबरोबर इतरही काही निर्णय घेण्यात आले आहेत.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यांच्या किंमती दिड टक्क्यांनी वाढल्या आहेत.
त्याचबरोबर आता हॉटेलमध्ये देखील शॉपसारखी विदेशी मद्याची विक्री करता येणार आहेत. त्यावर मात्र 10 ते 15 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागातील 1 हजार 223 पदं भरली जाणार आहेत.
त्यामुळे राज्यात मद्य महागल्याने राज्याच्या तिजोरीत तब्बल14 हजार कोटींचा महसुल वाढणार आहे.