गेल्या महिन्यात साखरेच्या भावात चिंताजनक वाढ झाली होती. एन सणासुदीच्या काळात साखरेचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे होते मात्र आता
सरकारने साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले.त्यानंतर आता 22 ऑगस्टच्या तुलनेत १४ सप्टेंबरला साखरेचे भाव 12 ते 16 रूपयांनी कमी झाली आहेत.
साठेबाजांविरोधात सरकारने कारवाई केली काही नियमात बदल केले. साखरेचे भाव वाढत होते. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना झटका बसला. मुंबईत 22 ऑगस्टला साखरेचा भाव 68 किलो होता.आता 12 सप्टेंबरला त्यात घसरण होऊन 54 झाला. ऐन सणावाराच्या तोंडावर साखरेचे दर वाढताना दिसले. साखरेचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. अखेर आता साखरेचे दर कमी होताना दिसत आहेत.