पुणे (प्रतिनिधी) : विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं विश्वविक्रमाला गवसणी घातली. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्यानं एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. ऋतुराज गायकवाड सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.
भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंहने 15 वर्षांपूर्वी एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्या या खेळीची आठवण जागवणारी फटकेबाजी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने केली. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात आज क्वार्टर फायनल सामना खेळला जातआहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्रानं उत्तर प्रदेशसमोर 50 षटकात 331 धावांचं लक्ष्य ठेवले.

महाराष्ट्राकडून ऋतुराजनं अवघ्या 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी. ज्यात 10 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाडचे हे मागील आठ डावातील सहावं शतक आहे. यावरून त्याच्या सर्वोत्तम फॉर्मचा अंदाज लावला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्त्वाचा भाग आहे. 25 वर्षीय ऋतुराजचे लिस्ट-ए कारकिर्दीतील हे 13वं शतक आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा