मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ८ महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ८ महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 8 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, १० जिल्ह्यात 'उमेद मॉल', ‘ई-नाम’, विशेष न्यायालय स्थापन यासह वर्धा, पिंपरी चिंचवडसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आज झालेली मंत्रिमंडळाची बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मोजकेच नेते उपस्थित होते. 

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ : लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा ; सुप्रिया सुळेंचा मोठा आरोप?

मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय काय निर्णय घेण्यात आले?

• राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार. अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय. एकूण १ हजार ९०२ पुरस्कार दिले जाणार. (ग्राम विकास विभाग)

 • ‘उमेद’- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी करणार. राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार. (ग्राम विकास विभाग) 

 • ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी. राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन होणार. त्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. (सहकार व पणन विभाग)

• महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन होणार. (विधि व न्याय विभाग) 

• पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना. या न्यायालयांसाठी पदांना मंजूरी. (विधि व न्याय विभाग) 

'...तर माझ्याकडे यायचे नाही, तिथून मागे फिरायचं' ; 'त्या' प्रकरणांनंतर अजित पवारांचा मंत्र्यांना इशारा

•  वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी २३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. (जलसंपदा विभाग)

• वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प (ता. आर्वी ) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी १९७ कोटी २७ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. (जलसंपदा विभाग)

• महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता. (महसूल विभाग )
इतर बातम्या
Join Whatsapp Group