दोन बायकांच्या भांडणामुळे भीख मागायला वेळ पुरेना ! भिखारी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत म्हणाला...
दोन बायकांच्या भांडणामुळे भीख मागायला वेळ पुरेना ! भिखारी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत म्हणाला...
img
Vaishnavi Sangale
माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत समस्या या त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक अशा विविध समस्या माणसाला भेडसावत हसतात. समस्या ही समस्याच पण काही लोकांच्या समस्या ऐकल्या तर हसू आवरत नाही.मध्य प्रदेश मध्ये एक भिखारी त्याची समस्या मांडण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचला. त्याची समस्या ऐकून स्वतः: जिल्हाधिकारीही अचंबित झाले. 

मध्य प्रदेशातील खंडवा येथे सुरू असलेल्या एका सार्वजनिक सुनावणीत एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली. जिल्हाधिकारी ऋषभ कुमार गुप्ता यांच्यासह सर्व उच्च अधिकारी उपस्थित असताना, एका भिकाऱ्याने अशी तक्रार केली की ऐकणाऱ्या प्रत्येकाला धक्काच बसला.शफीक शेख नावाचा एक दिव्यांग भिकारी सुनावणीत पोहोचला. त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्याला दोन पत्नी आहेत आणि त्या दोघी सतत भांडत असल्याने त्याच्या भिक मागण्याच्या कामावर परिणाम होत आहे. शफीकने म्हटले की, त्याला दोन्ही पत्नींना सोडायचे नाही, उलट त्यांना एकाच छताखाली एकत्र राहायला शिकवायचे आहे.

प्रणिती शिंदेंचं वादग्रस्त वक्तव्य, 'त्या' विधानाचा नरेंद्र मोदींनी घेतला समाचार

शफीकच्या म्हणण्यानुसार, शफीक अंध असून, तो खंडवा आणि महाराष्ट्रादरम्यान धावणाऱ्या ट्रेन आणि बसमध्ये भीक मागून आपला उदरनिर्वाह करतो. तो भीक मागून दररोज दोन ते तीन हजार रुपये कमावतो आणि दोन्ही पत्नींची काळजी घेण्यास तो सक्षम आहे. परंतु, त्यांच्यातील सततच्या भांडणामुळे त्याला भीक मागण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्यामुळे त्याच्या कमाईवर परिणाम होत आहे. म्हणूनच, त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणात हस्तक्षेप करून पत्नींना समजावण्याची विनंती केली.

भिकाऱ्याची ही अनोखी तक्रार ऐकून जिल्हाधिकारी सुरुवातीला काही क्षण स्तब्ध झाले, पण नंतर हसत हसत त्यांनी हे प्रकरण महिला आणि बालविकास विभागाकडे चौकशीसाठी पाठवले. शफीकच्या दोन्ही पत्नींना बोलावून त्यांचे समुपदेशन करावे आणि त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश त्यांनी दिले. 
begger |
इतर बातम्या
Join Whatsapp Group