दुर्दैवी ! 25 दिवसांपूर्वीच लग्न झालं, हनीमूनला गेले अन् 1000 फूट खोल दरीत कोसळली कार; नेमकं काय घडलं?
दुर्दैवी ! 25 दिवसांपूर्वीच लग्न झालं, हनीमूनला गेले अन् 1000 फूट खोल दरीत कोसळली कार; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
प्रतापगड येथील एक नवविवाहित जोडपे हनीमूनसाठी सिक्किमला गेले होते. ते गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. 29 मे रोजी पर्यटकांनी भरलेले वाहन मंगन जिल्ह्यातील एका डोंगरावर अपघातग्रस्त होऊन हजारो फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, दोन जण जखमी झाले, तर आठ जण बेपत्ता आहेत.

याच घटनेत प्रतापगडच्या सांगीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रहटिकर गावातील 29 वर्षीय कौशलेन्द्र प्रताप सिंह आणि त्यांची पत्नी अंकिता  यांचा समावेश आहे. त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

कुटुंबीयांनी सांगितले की, 5 मे रोजी या दोघांचे लग्न झाले होते. 24 मे रोजी नवदांपत्य कौशलेन्द्र आणि अंकिता हनीमूनसाठी उत्तर सिक्किमच्या मंगन जिल्ह्यातील चुंगथांग परिसरात गेले होते. तिथून ते एका पर्यटक वाहनातून फिरत गंगटोकमधील हॉटेलवर 29 मे च्या रात्री परतत होते. वाहनात ड्रायव्हरसह 10 पर्यटक होते. रात्री जोरदार पाऊस पडत होता, तेव्हा पर्यटकांनी भरलेले हे वाहन सुमारे हजार फूट खोल तिस्ता नदीच्या दरीत कोसळले.

स्थानिकांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तीन जणांना वाचवले, पण एकाचा जागीच मृत्यू झाला होता.
 
जखमी झालेल्या दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंकिता आणि कौशलेन्द्र यांच्यासह आठ जण बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध लष्कर आणि बचाव पथक घेत आहे.

कुटुंबीयांनी सांगितले की, अंकिता लखनऊच्या मेदांता रुग्णालयात औषध विभागात कार्यरत आहे, तर कौशलेन्द्र दिल्लीत सनदी सेवेची तयारी करत होते. या अपघाताची बातमी ऐकताच दोन्ही कुटुंबांमध्ये खळबळ माजली.

कौशलेन्द्र हे त्यांच्या आई-वडिलांचे एकमेव अपत्य आहे. दोन्ही कुटुंबे मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत आहेत. अद्याप मुलांचा काहीच पत्ता लागलेला नाही.

जिल्हा प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके एकत्रितपणे सतत मदत कार्यात गुंतली आहेत. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, अपघातात आठ जण अजूनही बेपत्ता आहेत.

प्राथमिक अहवालानुसार, बेपत्ता लोकांपैकी सहा जण ओडिशाचे आणि दोन जण लालगंज, प्रतापगड येथील रहिवासी आहेत. अपघाताच्या दिवशी वाहन थेट तिस्ता नदीत कोसळले होते. हवामान खराब झाल्याने बचाव कार्य अधिक कठीण होऊ शकते, कारण पावसामुळे पाण्याची पातळी वाढू शकते. हा भाग भूस्खलनग्रस्त आहे आणि येथे अशा आव्हानांचा सामना नेहमीच करावा लागतो.
 
 
sikkim |
इतर बातम्या
Join Whatsapp Group