आजपासून अर्थात १ ऑगस्टपासून पाच मोठे आणि महत्त्वाचे बदल होणार आहेत. जे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. खिशाला कात्री लागणार की नाही हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.
१) एसबीआयकडून काही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सवरील मोफत हवाई अपघात विमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
२) यूपीआय अॅप्लिकेशनवर बॅलेन्स चेक करण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. आता दिवसाला केवळ ५० वेळा बॅलेन्स चेक करता येणार आहे.
३) ऑटो पे जसे की, ईएमआय, सबस्क्रिप्शन किंवा बिल पेमेंट ठराविक वेळेतच करता येणार आहे.
हे ही वाचा...
४) विमानात वापरलं जाणारं इंधन महागलं असल्याने विमान प्रवास आता महाग होऊ शकतो. त्यामुळे विमानप्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागू शकते.
५) आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर ३४ रूपये ५० पैशांनी स्वस्त होणार आहे. ही दर कपात १९ किलोच्या सिलिंडरवर लागू असणार आहे.