आज बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभा संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. त्यासाठी ओबीसी नेते आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहे. सभेचे जय्यत तयारी देखील सुरु आहे. त्यापूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांवर पुन्हा गंभीर आरोप केले. 2 सप्टेंबर 2025 रोजीचा जीआर रद्द करण्याची मुख्य मागणी या सभेत असेल. त्यामुळे महाएल्गार सभेनंतर वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जरांगेंच्या लोकांनी जिथं हैदोस घातला तिथं आजची ओबीसी महाएल्गार सभा होत असल्याचे भुजबळ यांनी सांगत जरांगेंना डिवचले. मागच्या सप्टेंबर पासून जे सुरू आहे ते आपण बघत आहात. आरक्षण जातंय या भीतीने अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. माझं या सर्वांना आवाहन आहे अस करू नका.आरक्षणाला धक्का लागणार नाही या साठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. ज्या बीड मध्ये जरांगेच्या लोकांनी धुडगूस घातला. आमदारांची घरे जाळली. ओबीसी नेत्यांवर हल्ले केले. तिथे हा ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके असे सगळे लोक उपस्थित राहणार आहे अशी माहिती भुजबळांनी दिली.
ओबीसी महाएल्गार मोर्चाला मराठा आंदोलकांनी विरोध केला आहे. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांना मोठा इशारा दिला. त्यांना माझा इतिहास माहिती नाही. शिवेसनेत असताना केलेल्या आंदोलनाची कल्पना नाही असे सूतोवाच केले. या लोकांना छगन भुजबळ यांचा इतिहास माहीत नाही. शिवसेना सोडल्यानंतर असे अनेक आव्हान पचवले आहे. जेव्हा हे सगळ लहान होते तेव्हा मी हे बघितलं आहे, असा टोला त्यांनी जरांगेंना लगावला. महाएल्गार सभेला अनेक जण येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर मोठी टीका सुद्धा केली.