झालेल्या मृत्यूंना 'आरसीबी'च जबाबदार ?  बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल समोर
झालेल्या मृत्यूंना 'आरसीबी'च जबाबदार ? बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल समोर
img
दैनिक भ्रमर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयोत्सवा दरम्यान ११ जणांचा मृत्यू झाला होता तर यामध्ये ५० हून अधिक लोक जखमी झाले होते. हे प्रकरण थेट कर्नाटक उच्च न्यायालयात गेले होते. याप्रकरणी आता सिद्धरामय्या सरकारने न्यायालयात विजयोत्सवा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीचा तपास अहवाल सादर केला आहे. अहवालात म्हटले आहे की, आरसीबीने पोलिसांच्या परवानगीशिवाय लोकांना विजय परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते.

आयपीएलचा अंतिम सामना जिंकल्यानंतर आरसीबी व्यवस्थापनाने ३ जून रोजी पोलिसांशी संपर्क साधला होता. पण, ही फक्त एक माहिती होती. व्यवस्थापनाने कायदेशीर परवानगी घेतली नव्हती. कायद्यानुसार, अशी परवानगी कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी घ्यावी लागते.

पोलिसांशी सल्लामसलत न करता, आरसीबीने दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०१ वाजता त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक फोटो पोस्ट केला. यामध्ये लोकांना मोफत प्रवेशाची माहिती देण्यात आली. लोकांना विधान सौधा येथून सुरू होणाऱ्या आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर संपणाऱ्या विजय परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.

त्यानंतर सकाळी ८ वाजता आणखी एक पोस्ट आली, यामध्ये माहितीचा पुनरुच्चार करण्यात आला. आरसीबीने त्यांच्या अधिकृत हँडल एक्स वर आरसीबी संघाचा एक प्रमुख खेळाडू विराट कोहलीची एक व्हिडीओ क्लिप शेअर केली. यामध्ये त्याने नमूद केले की, संघ ०४.जुन २०२५ रोजी बंगळुरू शहरातील लोकांसह आणि बंगळुरूमधील आरसीबी चाहत्यांसह हा विजय साजरा करू इच्छित आहे," असे अहवालात म्हटले आह.
इतर बातम्या
Join Whatsapp Group