रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जचा 8 विकेट्सने पराभव करत आणि अंतिम फेरीत धमाकेदार प्रवेश केला. आरसीबीने चौथ्यांदा आयपीएलची अंतिम फेरीत गाठली आहे.
याआधी तीन वेळा या संघाने चॅम्पियन होण्याची संधी गमावली आहे. पण यावेळी तरी आरसीबी आणि विराट कोहलीची 18 वर्षांची प्रतीक्षा संपेल का याकडेच सर्वांचे लक्ष लागलं आहे. कारण आयपीएल 2025 मध्ये, बंगळुरूचा संघ अतिशय वेगळ्या पण दमदार शैलीत खेळत आहे आणि पहिल्यांदाच त्यांच्यात जिंकण्याची भूकही दिसत्ये.
त्यामुळेच तब्बल 9 वर्षांनी आरसीबीचा संघ ट्रॉफीच्या इतक्या जवळ पोहोचला आहे, म्हणून खेळाडूंपासून ते संघाच्याचाहत्यांपर्यंत सर्वजण भावनिक झाल्याचं दिसून आलं. काल आरसीबीचा संघ अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर विराट कोहलीही खूप आनंदी होता. त्याने त्याची पत्नी अनुष्का शर्माला एक इशारा केला, तोही खूपच चर्चेत आहे. (विजयापासून) फक्त 1 पाऊल दूर असं म्हणतं त्याने 1 बोटं दाखवलं, ते पाहून अनुष्काही खूप आनंदी दिसत होती. आता दोघांचीही रिॲक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
आयपीएलच्या पहिल्या पर्वातील आरसीबीच्या पहिल्या सामन्यापासून ते आतापर्यंत विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे जो संघासोबत राहिला आहे. तो सोडला तर संघात अनेक खेळाडू आणि प्रशिक्षक आले आणि गेले देखील, पण कोहली नेहमीच आरसीबीसोबत राहिला.
त्यामुळे, फायनल जिंकून आरसीबीचा संघ आयपीएल चॅम्पियन होण्यासाठी विराटनेच सर्वात जास्त वाट पाहिली आहे. म्हणूनच काल, (29 मे) पंजाबला हरवून जेव्हा आरसीबीची संघ ट्रॉफीच्या आणखी जवळ आला, तेव्हा विराटने आपला आनंद उघडपणे व्यक्त केला. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर, तो त्याची पत्नी अनुष्काला 1 बोट दाखवत काहीतरी बोलताना दिसला. ‘आणखी फक्त एक खेळ बाकी आहे, एक पाऊल (विजयापासू) दूर आहे’ असे म्हणत होता, असं त्याच्या हावभावांवरून वाटत होतं.