ऐन सणासुदीच्या तोंडावर बळीराजा हतबल ; कांद्याच्या दरात 'इतक्या' रुपयांची घसरण
ऐन सणासुदीच्या तोंडावर बळीराजा हतबल ; कांद्याच्या दरात 'इतक्या' रुपयांची घसरण
img
Dipali Ghadwaje
मनमाड :  पुढील आठवड्यात दिवाळीनिमित्त बाजार समिती बंद असल्याने व सणासुदीला हातात दोन पैसे राहावेत, यासाठी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणल्याने पर्यायाने आवक वाढल्याने कांद्याच्या दरात ७२५ रुपयांनी घसरण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कांद्याचे दर चांगल्या प्रकारे वाढले होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने बाजार समितीत देखील आवक वाढली होती. मात्र मागील पाच दिवसात कांद्याच्या दारात सरासरी ७२५ रुपयांची घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. 

पुढील आठवड्यापासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती दिवाळीनिमित्त बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याचे आवकमध्ये वाढ होत आहे. 

दुसरीकडे केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यात मूल्य दरात ८०० डॉलर प्रति टन दराने वाढ केली. तसेच नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा किरकोळ बाजार २५ रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने परिणाम झाला आहे.  

 
दर ४ हजारांपर्यंत खाली 
मागील पाच दिवसात कांद्याच्या सरासरी दरात टप्प्याटप्प्याने ८०० ते ९०० रुपयांची घसरण होत कांद्याची दर ४ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. लासलगावसह नाशिकच्या सर्वच बाजार समितीत दररोज एक लाख क्विंटलची कांद्याची आवक होत असून पाच दिवसात पाच लाख क्विंटल मागे कांदा उत्पादक  शेतकऱ्यांना ३५ ते ४० कोटी रुपयांचा तोटा बसल्याचे दिसून येत आहे.

 

 
onion |
इतर बातम्या
Join Whatsapp Group