बच्चू कडू यांनी आता सरकारला अल्टीमेटम देत आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहे. बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे.
बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले आहे. परिणामी गेल्या १५ तासांहून अधिक काळ अनेक वाहने महामार्गावर अडकून पडले आहे.
बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडूनही हालचाली सुरु झाल्या आहेत. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू" अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने अद्याप शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी, अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली आहे.
बच्चू कडू यांच्या मागण्या:
शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी जाहीर करावी.
पेरणी ते कापणीचा सर्व खर्च MREGS मधुन करावा.
कृषी मालाला हमी भावावर (MSP) 20% अनुदान देण्यात यावे.
शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लाऊन 5 लाख रु. अनुदान द्यावे.
दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे
नागपुर - गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा.
मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा.
उसाला सन 2025-26 या वर्षासाठी 9 टक्के रिकव्हरी साठी प्रति टन 4300/- रुपये व वर प्रति एक टक्का रिकव्हरीसाठी 430/- रुपये एफ.आर.पी. द्या.
कांद्याला किमान प्रति किलो 40/- रुपये भाव द्या. कांद्यावरील निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्य व निर्यात कर कायमस्वरूपी बंद करा.
भाव पाडण्यासाठी होत असलेला नापेड व एन.सी.सी.एफ.चा वापर बंद करून या संस्थांचा उपयोग शेतकऱ्यांना कांद्याला रास्त दाम मिळावे यासाठी करा.
गायीच्या दुधाला किमान 50/- रुपये बेस रेट व म्हशीच्या दुधाला 65/- रुपये भाव द्या.