रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया, हात जोडले अन् म्हणाले, लिहिलेलं पुसता येत पण...
रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया, हात जोडले अन् म्हणाले, लिहिलेलं पुसता येत पण...
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केले. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं ते म्हणाले. रविंद्र चव्हाण यांच्या या विधानाचा जोरदार निषेध केला जात आहे. अशातच विलासराव देशमुख यांचे सुपुत्र, अभिनेता रितेश देशमुख याने रविंद्र चव्हाण यांच्या या विधानाला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख यानं रवींद्र चव्हाणांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. रितेश देशमुख म्हणाला की, "दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेल्या असतात. लिहिलेलं पुसता येतं. कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र."  त्यानं मोजक्या शब्दांत सणसणीत उत्तर दिलं.  रितेश देशमुखनं हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.  या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्याची दिलगिरी व्यक्त केली आहे ते म्हणाले की, "लातुरमध्ये मी जे काही म्हटलं, मी विलासरावांवर जराही, कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्या टिकाटिप्पणी केलेली नाही. विलासराव खूप मोठे नेते होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. लातुरात विलासरावांवरच फोकस ठेवून काँग्रेस तिथे मतदान मागतंय, त्यामुळे त्याठिकाणी आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात झालेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक दृष्टीकोनातून झाल्यात. यासंदर्भात मी तसं म्हटलं, पण तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव, जे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो... तुम्ही राजकीयदृष्ट्या याकडे पाहू नका, एवढं मी त्यांच्या चिरंजीवांना सांगेन..."   
latur |
इतर बातम्या
Join Whatsapp Group