सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार ; अज्ञातांकडून चार राऊंड फायर
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार ; अज्ञातांकडून चार राऊंड फायर
img
दैनिक भ्रमर
बॉलिवूड अभिनेतचा सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. सलमान खानच्या घराबाहेरील फायरिंगमागे बिश्नोई गँगचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सलमान खानच्या घराबाहेर रविवारी सकाळी गोळीबार झाला. हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोई टोळीने केला असावा, असा संशय मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून अनेक पथके तैनात केली आहेत.

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या तपासासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. यापूर्वी सलमानच्या वडीलांना चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती, त्यानंतर धमकीचा ई-मेलही आला होता. आता रविवारी 14 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराचा संबंधही बिश्नोई गँगशी असल्याचं बोललं जात आहे. 

येवला तालुक्यात ८ दिवसांचे अर्भक आढळून आल्याने खळबळ

बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या मागे बिश्नोई गँग असल्याचा संशय मुंबई गुन्हे शाखेला आहे. त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेने त्या दृष्टीने पुढील तपास सुरु केला आहे. बिश्नोई गँग सलमानला धमकी का देत आहे. बिश्नोई गँगने सलमान खानला लक्ष्य करण्यामागचं नेमकं कारण जाणून घ्या.

नेमकं प्रकरण काय?

1998 साली हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता. 

सलमान खानने दोन वेळा चिंकारा हरणांची शिकार केल्याला आरोप आहे.

लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं.

हरणांची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे.

याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group