अभिनेत्री मृणार ठाकूरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी धनुष आणि मृणाल गुपचूप लग्न करणार आहे, अशा चर्चा आहेत. मृणाल आणि धनुष हे लग्न करणार असल्याच्या चर्चांवर अखेर मृणालने मौन सोडले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मृणाल म्हणाली, ‘फक्त दिखाव्यासाठी कधीच लग्न करु नये… जेव्हा योग्य वेळ येईल… जेव्हा तुम्हाला योग्य जोडीदार मिळेल, एक अशी व्यक्ती जिच्यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकाल, ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला चांगलं वाटेल अशी व्यक्ती जी गप्प बसल्यानंतर देखील तुम्हाला त्रास होणार नाही, तेव्हा तुम्ही लग्न केलं पाहिजे…’
एवढंच नाही तर, शनिवारी तुझं लग्न होणार आहे ? असं विचारल्यानंतर अभिनेत्री हसत म्हणाली, ‘आज माझी हळद आहे.. उद्या संगीत आणि जेवून नक्की जा…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सांगायचं झालं तर, मृणाल सध्या आगामी ‘दो दीवाने शहर में’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमात मृणाल हिच्यासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र मृणाल हिची चर्चा सुरु आहे . सिनेमा 20 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
सांगायचं झालं तर, लग्नाबद्दल पसरलेल्या अफवांवर मृणाल म्हणाली, ‘अफवा ऐकल्यानंतर मला हसायला येतं… कारण मला स्वतःला माहिती नाही की, माझं लग्न कधी आहे… मी सांगतेय, जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी सर्वांना माझ्या लग्नाबद्दल सांगेल… मला प्रेमाचा अनुभव आवडतो… ‘, असं देखील मृणाल ठाकूर म्हणालेली.