रस्ते अपघातात दरवर्षी 178000 लोकांचा मृत्यू होतो आणि यातील 60 टक्के बळी 18 ते 34 वयोगटातील असतात. अपघातांची संख्या वाढली असून हे मान्य करण्यात मला अजिबात संकोच वाटत नाही. हे असे एक क्षेत्र आहे जिथे आमच्या विभागाला यश मिळालेले नाही. अशी माहिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बोलताना नितिन गडकरी यांनी दिली
नितीन गडकरी यांनी सांगितले की, दिल्ली हे सर्वात जास्त प्रभावित शहर आहे, जिथे 1,457 हून अधिक मृत्यू झाले आहेत. यानंतर, बंगळुरूमध्ये 915 आणि जयपूरमध्ये 850 मृत्यू झाले आहेत. तथापी, रस्ते अपघातात इतके लोक मृत्युमुखी पडत असतानाही कायद्याचा धाक राहिलेला नसल्याबद्दल गडकरींनी नाराजी व्यक्त केली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्यांनी काही लोक हेल्मेट घालत नाहीत, काही लोक सिग्नलचे उल्लंघन करतात, असही नमूद केलं. 'अनेक वेळा पंतप्रधान होण्याची ऑफर आली'
तसेच , रस्त्यावर ट्रकचे पार्किंग हे अपघातांचे प्रमुख कारण आहे. अनेक ट्रक लेनची शिस्त पाळत नाहीत, अशी नाराजीही यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. तसेच गडकरींनी संबंधित अधिकाऱ्यांना भारतात बस बॉडी बनवताना आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, बसच्या खिडकीजवळ हातोडा ठेवण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. जेणेकरून अपघात झाल्यास या हातोड्याने बसची काच तोडून जीव वाचवणे शक्य होईल.
दरम्यान , जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी जातो. तेव्हा भारतातील रस्ते सुरक्षा व्यवस्थेबद्दल बोलायला मला लाज वाटते. मी माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो, असेही यावेळी गडकरी यांनी नमूद केले. काही वर्षांपूर्वी माझा आणि माझ्या कुटुंबाचा मोठा अपघात झाला होता. यानंतर आम्हाला बराच काळ रुग्णालयात राहावे लागले होते. देवाच्या कृपेने मी आणि माझे कुटुंब वाचलो. त्यामुळे मला अपघातांचा वैयक्तिक अनुभव असल्याचंही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
भारतातील सर्वाधिक रस्ते अपघातांची संख्या असेलली राज्य -
उत्तर प्रदेश: 23,652
तामिळनाडू: 18,347
महाराष्ट्र: 15,366
मध्य प्रदेश: 13,798