अतिवृष्टी अनुदानात कोट्यवधींचा घोटाळा , जालन्यातील १० तलाठ्यांचे निलंबन ; नेमकं काय प्रकरण?
अतिवृष्टी अनुदानात कोट्यवधींचा घोटाळा , जालन्यातील १० तलाठ्यांचे निलंबन ; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
जालना अतिवृष्टी आणि अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. १० तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले.

अनुदान वाटपात गैरव्यवहार झाल्याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेण्यात आली. त्यानंतर तलाठ्यांचे खुलासे घेण्यात आले यामध्ये ते दोषी आढळून आले. त्यानंतर त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपीटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून २६ अधिकाऱ्यांनी तब्बल ३५ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने १० तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली. जालना जिल्ह्यात २०२२ ते २०२४ मध्ये अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार चौकशी केली असता अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गावातील २६ ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी तब्बल ३५ कोटी हडपले असल्याचे उघडकीस आले.

यातील १० तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले असून इतर तलाठ्यांचे खुलासे घेवून त्यानुसार अभिलेख तपासून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे जालना जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group