सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथे धक्कादायक घटना घडली आहे. विंचुरी दळवी गावात भैरवनाथ मंदिराजवळ एका ५० वर्षीय पुरुषाची निर्घूण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत व्यक्तीचे नाव विलास आबाजी दळवी (उर्फ बजरंग, वय ५०) असे असून ते या गावातीलच रहिवासी होते.
ही घटना मंगळवार (दि.4) रोजी मध्यरात्री बारा ते एकच्या दरम्यान घडली असून, अज्ञात व्यक्तीने मयताच्या चेहऱ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे वृत समोर आले आहे. हत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.