शतकातील सर्वात मोठा भूकंप! जपानसह अनेक देश हादरले; भारतातील ‘या’ राज्यात भूकंपाचे धक्के
शतकातील सर्वात मोठा भूकंप! जपानसह अनेक देश हादरले; भारतातील ‘या’ राज्यात भूकंपाचे धक्के
img
Nandini khandare More

गुरुवारी जगातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. विशेषतः व्हेनेझुएलामध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक इमारतींना तडे गेले असून काही ठिकाणी घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, जपाननंतर भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा परिसरात जमिनीला कंप जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाने धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्या भीतीचं वातावरण आहे.

मात्र, दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या दोन भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने आलेल्या या शक्तिशाली भूकंपामुळे राजधानी काराकसमध्ये इमारती कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. असं देखील सांगण्यात येत आहे की, गेल्या 100 वर्षांनंतर आलेला हा सर्वात शक्तीशाली भूकंप आहे. एवढंच नाही तर जपान येथे देखील 6.9 तिव्रतेचा भूकंप जाणवला.

व्हेनेझुएलात आलेल्या भूकंपामध्ये 22 मजली बिल्डिंग कोसळली..
व्हेनेझुएला येथे आलेला भूकंप इतका शक्तीशाली होता की, 22 मजल्याची बिल्डिंग एखाद्या पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळली.. बुधवारी संध्यकाळी (तेथील स्थानिक वेळेनुसार) एका भागात 7.2 आणि 7.5 तिव्रतेचे 2 भूकंप आले. या धक्क्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या. राजधानी काराकसमध्ये सध्या घबराटीचं वातावरण आहे. तर लोक भीतीने घराबाहेर पळत आहेत. या दुर्दैवी घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या (USGS) अंदाजानुसार, मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

नेपाळमध्ये 3.8 तीव्रतेचा भूकंप
गुरुवारी पहाटे नेपाळमध्ये 3.8 तीव्रतेचा भूकंप झाला; हा भूकंप भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5 वाजून 21 मिनिटे 43 सेकंदांनी झाला. राविवारी देखील जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.. जपान येथील दुर्गम आणि डोंगराळ भाग हुमला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रता असलेल्या त्या भूकंपाचा केंद्रबिंदू हुमला जिल्ह्यातील श्रीनगर भागात होता. मात्र, यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group