राज्यात पावसानं आता दमदार एंट्री केली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब असून 24, 25, 26, 27, 28 पर्यंत राज्यात असाच धो धो पाऊस राहण्याचा अंदाज आहे. अनेक भागात रात्रभर पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर पाऊस होता. अनेक भागात पाणी साचले आहे. कुर्ला, किंग सर्कल आणि सायनमध्ये पाणी साचले. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला. मॉन्सून राज्यभरात पसरला आहे. पुढील 3 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. या पावसामुळे रस्ते जलमय झाले. पुढील दोन ते तीन दिवस अरबी समुद्र, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशच्या दिशेने मॉन्सून पुढे सरकत आहे.
काल संध्याकाळपासून पाऊस थांबलेला नाही. अधूनमधून जोरदार सरी येत आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या उपनगरात पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाची हजेरी
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची सुरुवात. काल काही भागांत पावसाचा जोर वाढल्याने पाणी साचल्याच्या घटना. मात्र काही वेळातच पावसाचा वेग कमी होताच साचलेल्या पाण्याचा झाला निचरा. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, वातावरणात गारवा तर दुसरीकडे पावसामुळे अनेक ठिकाणी महावितरणाची खांब पडल्याने बत्ती गुल झाली. राज्याभरात पाऊस बघायला मिळत आहे.