नागरिकांनो सावधान! आज 'या' भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा
नागरिकांनो सावधान! आज 'या' भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा
img
Dipali Ghadwaje
भारतात सर्वत्र मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळं सध्या देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. आजही देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, आजही (शनिवारी ) मुंबईत काही ठिकाणी  मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात काही ठिकाणी  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसानं हजेरी लावली  आहे. मात्र, आज हवामान विभागानं जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. 

विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता
हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांत गुरुवारपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. यानुसार मुंबईत शुक्रवारी पहाटे काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पालघर जिल्ह्यांत शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तसेच गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम असून पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 

'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट 
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group