छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सरकारने घेतला ''हा'' मोठा निर्णय
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सरकारने घेतला ''हा'' मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर
26 ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.  कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळला.  दुर्घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते . तसेच, शिवभाक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याने संतापाची लाट उसळली होती. दरम्यान   या प्रकरणी शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली. पोलिस जयदीप आपटेची कसून चौकशी करत आहेत. यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

या  पार्श्वभूमीवर मंत्री दिपक केसरकर यांनी 100 कोटींचा प्रस्ताव ठेवला आहे.  मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी नवा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी 100 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे ठेवला आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group