रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोट्यवधी भारतीयांना मोठे गिफ्ट दिले आहे. आरबीआयने रेपो दरात तिसऱ्यांदा कपातीची घोषणा केली. त्यामुळे कार, घराचा ईएमआय कमी होणार आहे. RBI ने व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात केली.
त्यामुळे रेपो रेट आता 5.5 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील व्याजदरात पुन्हा मोठी कपात होणार आहे. आरबीय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी हे पद स्वीकारल्यापासून सलग तिसऱ्यांदा भारतीय ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.