कबुतरखान्यासंदर्भात मोठी अपडेट, सुप्रीम कोर्टानं दिला 'हा' निर्णय
कबुतरखान्यासंदर्भात मोठी अपडेट, सुप्रीम कोर्टानं दिला 'हा' निर्णय
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर - मुंबईतील कबुतरखान्याचा प्रश्न चांगलाच तापला आहे. यातच आता सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कबूतखाने बंद करण्याचे आदेश हाय कोर्टाने दिलेले आहेत. हाय कोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय देखील समोर आला आहे. सुप्रीम कोर्टाकडून देखील हाय कोर्टानं कबुतरखान्यासंदर्भात दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे आता हाय कोर्टाच्या आदेशानुसार कबुतखाने बंदच राहणार आहेत.


एकीकडे हाय कोर्टाकडून मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी दुसरीकडे मात्र कबुतरखाने बंद करायला जैन समाजाचा विरोध आहे. वेळ पडली तर आम्ही शस्त्रे सुद्धा हाती घेऊ असे वादग्रस्त वक्तव जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केले आहे. 

न्यायालयाच्या आदेशानंतरही जैन समाजातील काही व्यक्तींनी दादर कबुतरखान्याजवळ कबुतरांना अन्न धान्य टाकले होते, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे, तसेच त्यांना कबुतरांना धान्य टाकण्यापासून रोखण्यात आलं. याविरोधात जैन समाजाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात 13 तारखेपासून उपोषण सुरू करू असा इशारा जैन समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group