मुंबईत भीषण अग्नितांडव ! एकाचा मृत्यू  तर तीन जण जखमी
मुंबईत भीषण अग्नितांडव ! एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी
img
वैष्णवी सांगळे
मुंबईत ऐन दिवाळीत मोठी घटना घडली आहे. दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरातील मच्छिमार नगर परिसरात आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एका १५ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 


चाळीतील एका १+१ घराच्या वरच्या मजल्यावर आग लागली होती. काही मिनिटात आग चाळीतील आणखी काही घरांमध्ये पसरली, मात्र, अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, तीन  जण होरपळले आहेत.

आगीत चार जण जखमी झाले आणि त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले, यश विठ्ठल खोत (15) याला मृत घोषित करण्यात आले, असे एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले. देवेंद्र चौधरी (30), विराज खोत (13), संग्राम कुरणे (25) या जखमींवर उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

कफ परेड परिसरातील कॅप्ट प्रकाश पेठे मार्गावरील एका चाळीत आज सकाळी आग लागली. या आगीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. ४.३५ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने ही आग विझवली. 
MUMBAI |
इतर बातम्या
Join Whatsapp Group