मुंबईत पुन्हा दोन मुली बेपत्ता; चिमुकले बेपत्ता होण्याचा आकडा वाढला
मुंबईत पुन्हा दोन मुली बेपत्ता; चिमुकले बेपत्ता होण्याचा आकडा वाढला
img
वैष्णवी सांगळे
मुंबईत चिमुकले मुले बेपत्ता होण्याचं प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. नवी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, शहरातून आतापर्यंत तब्बल 458 मुले व मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच  खारघर आणि कोपरखैरणे या दोन वेगवेगळ्या भागांतून पुन्हा दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

सतत बेपत्ता होण्याच्या या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे पसरले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मुले बेपत्ता होणे ही केवळ स्थानिक पोलिसांचीच नव्हे, तर राज्य सरकारचीही चिंता वाढवणारी बाब ठरली आहे. 

या वाढत्या घटनांची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी नवी मुंबईतील बेपत्ता मुलींच्या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली असून, यामागे काही मोठे रॅकेट किंवा मानवी तस्करी तर नाही ना, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्द्यांची दखल घेऊन योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्याचा आश्वासन दिलं होतं. 
MUMBAI |
इतर बातम्या
Join Whatsapp Group