पोलिस दलात खळबळ ! तलावात उडी मारून पोलिसाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
पोलिस दलात खळबळ ! तलावात उडी मारून पोलिसाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
img
वैष्णवी सांगळे
नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने सोमवारी रात्री अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. पत्नी सोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून नैराश्यात आलेल्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शीलरत्न बेलेकर यांचा दोन महिन्यांपासून पत्नीसोबत वाद सुरू होता. त्यांचा मुलगा आठवीत तर मुलगी चौथीत शिकते. दोघांचा ताबा शीलरत्न यांच्याकडे आहे. अपत्यांचा ताबा मिळावा यासाठी पत्नी त्यांच्यामागे तगादा लावायची. यावरून शीलरत्न व त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू होता. १९ फेब्रुवारीला ते प्रतापनगर पोलिस ठाण्यात गेले नाही. तेव्हापासून ते गैरहजर होते.

रविवारी दुपारी शीलरत्न हे त्यांचे भाऊ अजय भीमराव बेलेकर (वय ४९, रा. कामगार कॉलनी) यांच्याकडे आले. काही वेळानंतर ते घरून निघाले. त्यानंतर त्यांचा कुणाशीही संपर्क झाला नाही. अजय यांनी शीलरत्न हे बेपत्ता असल्याची तक्रार प्रतापनगर पोलिसांत दिली. दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना मंगळवारी सकाळी अंबाझरी तलावात मृतदेह तरंगताना दिसला. अंबाझरी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. शीलरत्न यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.

सततची ड्युटी, वाढता कामाचा ताण, अपुरी विश्रांती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे अनेक पोलीस कर्मचारी मानसिक तणावाला सामोरे जात असल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group