केतन हत्याप्रकरणाचं ''ते''  गूढ अखेर समोर !
केतन हत्याप्रकरणाचं ''ते'' गूढ अखेर समोर !
img
Nandini khandare More


केतन अग्रवाल प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या हत्याकांडाचं गूढ अखेर समोर आले आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून आता अत्यंत महत्वपूर्ण माहिती आता समोर आली आहे. 

या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करताच दोघांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. दोघे आता एकमेकांवर खूनाचा आरोप लादत आहेत. पोलिसांसमोर दोघांनी असे अनेक राज उघड केले आहेत जे आतापर्यंत समोर आले नव्हते.

समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालला दरीत ढकलण्याचा सिग्नल देण्यासाठी सियाने एक इशारा केला होता. १४ जून रोजी सिया केतनला पहिल्या प्रयत्नात मारू शकली नाही, तेव्हा चेतनने स्वतः त्याचा खून करण्याची जबाबदारी घेतली. पोलिस सूत्रांच्या मते, केतन अग्रवालचा खून करण्याची हा तिसरा प्रयत्न होता. यापूर्वी दोन वेळा सिया गोयल होणारा पती केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली होती, पण ती त्याला दरीत ढकलू शकली नाही. सियाने पोलिसांना सांगितले की, १४ जून रोजी दुसरा प्रयत्नही अयशस्वी झाल्यानंतर चेतन वैतागला आणि सियासमोर रडलाही. दोन वेळा अपयश आल्यानंतर चेतनचा संयम सुटला आणि त्याने सियाला म्हटले, “तुझ्याकडून होत नाहीये, आता मी स्वतः याला संपवतो.” त्यानंतर १८ जून रोजी चेतनने स्वतः सूत्रे हाती घेतली आणि केतनला दरीत ढकलले. पोलिसांच्या मते, चेतन लवकरात लवकर केतनला रस्त्यातून हटवून सियासोबत महाबळेश्वरमध्ये एकांतात वेळ घालवू इच्छित होता.

रिपोर्टनुसार, सिया गोयलने चौकशीत कबूल केले की, केतनला खोल दरीत ढकलण्यासाठी दोघांनी आधीच एक कोड सिग्नल ठरवून ठेवला होता. प्लॅननुसार, सियाने बसून इशारा करायचा होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “नियोजित योजनेअनुसार सियाने बसून इशारा करायचा आणि त्यानंतर चेतनने पुढे येऊन केतनला दरीत ढकलायचे. त्यांनी योजना अगदी तशीच अमलात आणली.” अधिकाऱ्याने पुढे म्हटले, “सिया आणि चेतनने आम्हाला सांगितले की नेमके काय घडले आणि कसे घडले. केतनला याचा अजिबात अंदाज नव्हता की त्याच्यासोबत काय होणार आहे. तो काहीही समजून घेण्यापूर्वीच त्याला दरीत ढकलण्यात आले.”

पोलिसांच्या चौकशीदरम्यान सिया आणि चेतन एकमेकांवर आरोप करताना दिसले. एका अधिकाऱ्याने सांगितले, “सुरुवातीला सिया आणि चेतन दोघांनी एकमेकांवर दोष ढकलण्याचा प्रयत्न केला, जी आरोपींसाठी चौकशीत सामान्य गोष्ट आहे. मात्र शेवटी सियाने कबूल केले की साजिश तिनेच रचली होती आणि चेतनही त्यात सामील होता.” अधिकाऱ्याने सांगितले की, चेतनने सुरुवातीला दावा केला होता की तो किल्ल्यात होता, पण जिथून केतनला ढकलण्यात आले त्या जागी तो गेला नव्हता आणि त्याला काहीही माहिती नव्हते. “मात्र हे स्पष्ट होते की तो खोटे बोलत होता. शेवटी दोघांनी गुन्ह्यात आपली भूमिका कबूल केली आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला.”



इतर बातम्या
Join Whatsapp Group