राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता सध्या राजकारण चांगलेच तापताना दिसते आहे. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटातून फुटून बाहेर पडलेले खासदार संजय दीना पाटील वादात सापडले आहेत. त्यांनी पत्रकारांना धमकावलं, शिवीगाळ केली. दरम्यान त्याच्या या कृतीबद्दल शिवसेनेच्या बड्या नेत्याने माफी मागितली असल्याची अपडेट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , खासदार संजय दीना पाटील यांचा रागाच्या भरात बोलताना त्यांचा संयम सुटला. पत्रकारांना मारण्याची भाषा केली. माध्यमांनी हा विषय लावून धरला असून संजय पाटील यांच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न विचारला जात आहे. संजय दीना पाटील यांनी जी भाषा वापरली, त्यांच्याकडून जी चूक झाली त्या बद्दल संजय शिरसाट यांनी माफी मागितली आहे. संजय शिरसाट आमदार, मंत्री आणि शिवसेना प्रवक्ते आहेत. “गेल्या तीन-चार दिवसांपासून आपल्या माध्यमातून संजय दीना पाटील आणि संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरु आहे. कोणी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत आहे. कोणी स्टेनगन घेऊन फोटो काढून दाखवतोय. अशा प्रकाराचं कोणी समर्थन करणार नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.
“संजय दीना पाटील यांच्याबद्दल संजय राऊतने अपशब्द वापरले. संजय पाटील यांनी भावनेच्या भरात प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. धमकी देताना कोणी अशी उघड धमकी देत नाही. भावनेचा उद्रेक झाल्यामुळे त्यांच्या तोंडातून हे वाक्य निघालं असावं. एकनाथ शिंदे संजय पाटील यांच्यावर नाराज आहे अशा बातम्या चालवल्या जात आहेत. पण संजय पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बोलणं झालं, ते त्या दोघांना माहित आहे. संजय पाटील यांच्या बोलण्याच कोणी समर्थन करणार नाही” हे संजय शिरसाट यांनी सांगितलं.
संजय राऊत आणि संजय पाटील यांनी आपसात भांडावं ते पत्रकारांना का शिव्या देत आहेत. या पत्रकारांच्या प्रश्नावर संजय शिरसाट यांनी माफी मागितली. “पत्रकारांना ते काही वेडंवाकडं बोलले असतील, तर मी त्यांच्यावतीने माफी मागतो. आम्ही त्यांच्याशी बोलू. एखाद्यावेळी फ्रस्ट्रेशन, राग आल्यामुळे ते बोलले असतील. मी सर्व पत्रकारांची माफी मागतो” असं संजय शिरसाट म्हणाले. “आम्ही त्यांच्याशी बोलू. अशा पद्धतीने बोलू नका अशी विनंती करु. तुमच्याबद्दल पत्रकारांना वेडवाकडं बोललं गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. लोकशाहीत अशी भाषा कोणी करु नये. एक जण पिस्तुल दाखवतो, शिव्या देतो त्यानंतर स्वाभिमान म्हणून प्रत्युत्तर दिलं असेल पण ते योग्य नाही” असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.