नीट पेपरफुटीनंतर TET पेपर फुटल्याने मोयही खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाप्रमाणेच TET पेपरफुटी प्रकरणाचे धागे दोरे लांबवर पसरलेले आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून तपास सरुर असून आता मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांनी मंगळवारी महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात बिजेंद्र कुमार गुप्ता यांच्या पत्नीला पाटणा येथून अटक केली. महाराष्ट्र पोलिसांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून, ठाणे जिल्ह्यातील कांगाव परिसरात सापळा रचून चार प्रश्नपत्रिका जप्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान तिन्ही आरोपींनी बिहारचा रहिवासी असलेल्या बिजेंद्र गुप्ता याला या कटाचा सूत्रधार म्हणून ओळखले आहे. बिहारचा रहिवासी असलेल्या बिजेंद्र गुप्ता यांच्यासाठी परीक्षेच्या पेपरफुटीशी संबंधित आरोप नवीन नाहीत. या प्रकरणापूर्वीही त्यांच्यावर अशा अनेक प्रकरणांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे आणि ते अनेक वेळा अटकेतून निसटले आहेत. टीईटी प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणावरून होणाऱ्या टीकेला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्र सरकारने सोमवारी विधानसभेत सांगितले की, या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा मकोका लागू करण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात झालेल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर विरोधी पक्षांकडून राजीनाम्याच्या मागणीला सामोरे जात असलेले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान हे विधान केले.
टीईटी आणि इतर राज्यस्तरीय परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता सरकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करेल, अशी घोषणाही त्यांनी केली. टीईटी पेपरफुटी प्रकरणी विधानसभेत निवेदन देताना भुसे म्हणाले की, “आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत, तर एक विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहे. 28 जूनच्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात जर कोणी दोषी आढळले, तर त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका लागू करता येईल का, याचा सरकार तपास करत आहे.”
संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंधित व्यक्तीवर मकोका लागू केल्यास जामीन मिळवणे अधिक कठीण होते, तसेच पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. भुसे यांनी सभागृहाला माहिती दिली की, पोलिसांनी सापळा रचून टीईटी प्रश्नपत्रिका विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पकडले आहे. परीक्षेच्या एक दिवस आधी त्यांच्याकडून 28 जूनच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा एक संच जप्त करण्यात आला. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळ आणि इतर विशिष्ट परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम, 1982 च्या कलम 6 आणि 8 अन्वये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोळगाव पोलीस ठाण्यात 27 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा टीईटी प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवणे, उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळणे आणि वितरणासाठी प्रश्नपत्रिका बाळगणे या आरोपांशी संबंधित आहे.
मंत्र्यांनी सभागृहाला माहिती दिली की, या रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाचा भाग म्हणून पोलिसांची दोन पथके बिहारला आणि प्रत्येकी एक पथक हरियाणा व दिल्लीला पाठवण्यात आले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, टीईटी आणि इतर परिक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची योजना तयार करण्यासाठी सरकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करेल. ठाणे जिल्हा पोलिसांना प्रश्नपत्रिकेचा काही भाग फुटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तीन जणांना अटक केली. त्यानंतर शनिवारी परीक्षेच्या अवघ्या काही दिवस आधी, महाराष्ट्रातील टीईटी 2026 परीक्षा पुढे ढकलण्यात आली.