शिवराज दिवटेच्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी  दिली ''ही'' मोठी अपडेट!
शिवराज दिवटेच्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी दिली ''ही'' मोठी अपडेट!
img
नंदिनी मोरे
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे देशभरात कुख्यात झालेल्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. दरदिवशी अत्यंत धक्कादायक आणि गंभीर असे गुणे समोर येत आहेत दरम्यान , आता बीडच्या  परळी तालुक्यातून  एक अत्यंत क्रूर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळी मध्ये टोकवाडी परिसरातील रत्नेश्वर टेकडी येथे लिंबुटा येथील शिवराज दिवटे  या युवकाला दहा ते बारा जणांनी रिंगण करून अमानुष मारहाण केली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आतामध्ये पुन्हा जातीय वातावरण तयार होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी महत्त्वाची माहिती दिली.

जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नका
बीडच्या परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तत्कालिक कारणातून झाली आहे. या प्रकरणाला कुठलाही जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आले असून दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर बीएनएस कलम 109, 126(2), 140(3), 118(1),189(2),189(4),190, 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group