राज्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार एंट्री होणार ! ''या''  9 जिल्ह्यांना हायअलर्ट
राज्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार एंट्री होणार ! ''या'' 9 जिल्ह्यांना हायअलर्ट
img
नंदिनी मोरे
राज्यात महिन्यापासूनच पावसाने जोरदार धुमाकूळ घातला होता. राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांना अवकाळी  पावसाने झोडपले होते. दरम्यान मी महिन्याचा शेवटी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची पुन्हा एकदा जोरदार एंट्री होणार असलयाचे संकेत आहते. राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. मान्सूनला देखील पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. 

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण विभागातील सिंधुदुर्गला तुरळ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. 

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीला पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्येही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक बरोबरच जळगाव, धुळे, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार वगळता सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढत आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. 

विदर्भातील 6 जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group