उद्धव ठाकरेंचं बच्चू कडू यांच्याबद्दल मोठं विधान; ती माझी मोठी चूक....
उद्धव ठाकरेंचं बच्चू कडू यांच्याबद्दल मोठं विधान; ती माझी मोठी चूक....
img
Nandini khandare More


राज्यातील घडामोडींना वेग आला असून  राजकारणातील घडामोडींना चांगलाच वेग आला वेग आला आहे. सध्या राजकीय पक्षातील पक्षांतर असो किंवा आरोप प्रत्यारोप असो हे सुरूच आहे. आता अशीच एक अपडेट समोर आली आहे. याचदरम्यान आता उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्याबद्दल एक मोठं विधान केलं आहे . त्यामुळे राजकरणात आता विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. 

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेची आमदारकी देखील देण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोला केला आहे.  मी त्यांना घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली, जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. दरम्यान या पक्षप्रवेशावेळी आमदार  अंबादास दानवे, राहुल पाटील आणि खासदार नागेश अष्टीकर यांची देखील उपस्थिती होती.

बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी देखील देण्यात आली. परंतु बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं प्रहारचे कार्यकर्ते नाराज आहेत, मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्रीवर आज हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी  अंबादास दानवे, राहुल पाटील आणि खासदार नागेश अष्टीकर यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर यावेळी जोरदार हल्लाबोल केला आहे.  आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता.  ‘घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या,  कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे एकमेव आमदार होते, मात्र तरी देखील त्यांना महाविकास आघाडीकडून राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर  बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group