महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय ! ''ही'' परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय ! ''ही'' परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
img
Nandini khandare More
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात गदारोळ निर्माण झाला होता. त्यांनतर ही  परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्यात आली होती. पेपरफुटीचे सत्र सुरु असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) एक मोठा निर्णय घेतला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) औषध निरीक्षक गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे पुरावे समोर आल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 22 मार्च रोजी झालेल्या या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. गुन्हे शाखेच्या अहवालानुसार, परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकाच उमेदवाराला परीक्षेचा प्रश्नसंच मिळाल्याने त्याने त्याचा लाभ घेतल्याचे तपासात समोर आले.

आमदार रोहित पवारांनी सुरुवातीलाच पेपरफुटीचा आरोप करत या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. आयोगाने या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आता रद्द झालेल्या या परीक्षेसाठी एमपीएससीकडून फेरपरीक्षा आयोजित केली जाईल. उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची किंवा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नसणार आहे. एमपीएससीने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही केली आहे, ज्यामुळे भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group