अभिजीत दीपकेंनी केली  सर्वात मोठी मागणी ! आता थेट...
अभिजीत दीपकेंनी केली सर्वात मोठी मागणी ! आता थेट...
img
Nandini khandare More
कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर मंतर येथील आंदोलन आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे चर्चेचा विषय बनलेले आहते. दरम्यान आता त्यांनी एक सर्वात मोठी मागणी केली आहे. 

कोकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पीएम केअर्स फंडातील निधीच्या वापराबाबत प्रश्न विचारला आहे. दिपके यांच्या मते, पीएम केअर्स फंडात तब्बल ८ हजार ४५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी जमा आहे, जो सध्या वापरला जात नाहीये. एकीकडे एवढा मोठा निधी पडून असताना, दुसरीकडे देशातील शाळांमध्ये पिण्याचे पाणी, बेंचेस आणि चांगले रस्ते यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. दिपके यांनी म्हटले आहे की, जर एका शाळेसाठी आठ कोटी रुपये लागत असतील, तर या निधीतून हजारोहून अधिक नवीन हाय-टेक मॉडेल शाळा उभारता आल्या असत्या.

मुलांच्या शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या या सोयीसुविधांसाठी निधी वापरला जात नसणे, हे चिंताजनक आहे. हा निधी लोकांचा असून, तो त्यांच्याच मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जावा, अशी विनंती जनतेने पंतप्रधानांना करावी, असे आवाहन दिपके यांनी केले आहे. पंतप्रधानांनी या निधीचा वापर करून त्यांना खरोखरच जनतेची काळजी आहे, हे दाखवून द्यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group