साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून शासकीय हमीवर कर्ज ; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतले मोठे निर्णय
साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून शासकीय हमीवर कर्ज ; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतले मोठे निर्णय
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय इतरही निर्णय घेण्यात आले आहे.  


 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :
1. मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत (नगरविकास विभाग)

2. मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव (पर्यटन विभाग)

3. राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प (गृह विभाग)

4. आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज (सहकार विभाग)

5. केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट (महसूल विभाग)

6. मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात (महसूल विभाग)


मंत्रिमंडळ बैठकीनंतर आणखी एक महत्त्वाची बैठक :
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आणखी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत चर्चा झाली. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकारी निघून गेल्यानंतर सर्व मंत्र्यांमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत कुणबी प्रमाणपत्राचा अहवाल पुढच्या आठ दिवसात येणार असल्याचं निश्चित झालंय. तसचे याबाबतची पुढची बैठक आता मराठवाड्यात होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group