".......तर माझा राजकारणाला रामराम" ; प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य
img
Dipali Ghadwaje
आरक्षणाला जर धक्का लागेल तर नक्कीच मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार, पदाचा आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही, म्हणूनच मी त्याग करेल, असं गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं.

या देशात आरक्षण, हे संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे. त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत उगीचच अपप्रचार एवढा झाला. लोकं बळी पडलेत. पण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि आमच्यासारखे अनेक जे कोणी संसदेत संविधानाची शपथ घेऊन बसलेली आहेत ते असं होऊ देणार नाही असं स्पष्ट वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलं.

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, आमचं सरकार ठाम…

काँग्रेस, आमची पूर्वीची राष्ट्रवादी आणि सर्वच पक्ष हे अनेक वर्ष सत्तेत राहिले. त्यांनी काहीच केलं नाही. निवडणुकीच्या काळात आरक्षणाचा मुद्दा विरोधक पुढे करत असल्याची टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. आमची सरकार ठाम आहे मराठ्यांना आरक्षण मिळालंचं पाहिजे. त्या दृष्टीने विधानसभेत विधेयक पारित झाला, कायदा पण बनला आहे. आणि दहा टक्के आरक्षण दिल आहे. आता ज्यांना तेही पटत नाही, ते विरोधाभास करतात.

मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कालचा, आजचा नाही फार जुना आहे. वर्षानुवर्षी या समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आलेली आहे. ज्यांच्याकडून मागणी होत आहे त्या समाजाचे खंबीर नेतृत्व अनेक वेळा महाराष्ट्रात राहिलेले आहेत. अनेक पक्षात राहिलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत आरक्षण नाही दिलं. पण आज आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त टीका करायची. कारण ते स्वतः देऊ शकले नाही. आणि आता चुका काढत बसायचं. एकच मुद्दा आता निवडणुकीच्या काळामध्ये विरोध करायचा हा एकच मुद्दा बनल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांवर केली.

महाराष्ट्रात तिन्ही पक्ष महायुती म्हणून काम करत आहोत आणि यशस्वीरीतीने या महाराष्ट्रमध्ये निवडणूकमध्ये सामोरे जाणार. महाराष्ट्रमध्ये आपले सरकार बनवणार असं वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलं.  

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group