''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'' ,
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'' , "या" नेत्याची कडवी टीका...
img
Dipali Ghadwaje
राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत तर दुसरीकडे मराठा आरक्षण प्रश्नही तापत असताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली असून राहुल गांधी भ्रमिष्ट आहेत त्यांना समजत नाही आपण कुठे काय बोलायचं असं म्हणत त्यांनी राहुल गांधींना चांगलंच सुनावलंय.

भाजप आणि मित्रपक्ष विधानसभेत 180 पेक्षा कमी जागा जिंकणार नाहीत हे माझ्याकडून लिहून घ्या असं रावसाहेब दानवे म्हणालेत. 

भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या अमेरिकी लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्याबद्दल भाजपसह मित्र पक्षांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचा आरक्षणाविरोधीचा चेहरा उघड झाल्याचं म्हटलं होतं. यावरूनच आता रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे.

काय म्हणाले रावसाहेब दानवे? 

काँग्रेसची मनस्थिती पूर्वीपासूनच आरक्षणाला विरोध करणारी असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले. यावेळी 1961 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी सर्व मुख्यमंत्र्यांना आरक्षण विरोध असल्याचे पत्र लिहिलं होतं. बाहेर देशात जाऊन आपल्या देशाबद्दल वक्तव्य करत देशाचे बदनामी करण्याचे त्यांना सवय झाली असल्याचं दानवे म्हणाले. राहुल गांधी भ्रमिष्ट झाले आहेत त्यांना समजत नाही आपण कुठे काय बोलायचं. परकीय भूमीवर जाऊन असं बोलायचं हे चुकीचं आहे. असेही दानवे म्हणाले. 
 
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group