राशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. रेशनकार्ड धारकांना पूर्वी ई-केवायसीची अंतिम तारीख 31 मार्च 2025 होती, परंतु आता ती 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर अजूनही तुम्ही तुमच्या राशन कार्डसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, तर ही प्रक्रिया 30 जून 2025 च्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. अन्यथा, तुमचं नाव राशन योजनेतून वगळलं जाऊ शकतं आणि तुम्हाला मोफत किंवा सवलतीचा राशन मिळणं थांबेल.
पूर्वी ई-केवायसीची अंतिम तारीख 31 मार्च 2025 होती, परंतु आता ती 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी ही एक संधी आहे.जर तुम्ही आधीच ई-केवायसी केली असेल आणि तरीही तुमचं नाव अपात्र म्हणून यादीतून वगळलं गेलं असेल, तर लगेच स्थानिक रेशन दुकान, अन्न आणि नागरी पुरवठा कार्यालयात संपर्क करा. सोबत तुमचा आधार कार्ड, मोबाइल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रं घेऊन जा आणि पुन्हा अर्ज करा.राशन कार्डवर मोफत धान्य मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे. वेळेत ई-केवायसी न केल्यास तुमचा लाभ बंद होऊ शकतो.