दुर्दैवी !  खेळण्यासाठी बाहेर गेले ते परतलेच नाही, तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू
दुर्दैवी ! खेळण्यासाठी बाहेर गेले ते परतलेच नाही, तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर
घरातून खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या  चार शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  ही मुले  सकाळी घरातून खेळण्यासाठी बाहेर पडली होती. मुले आली नसल्याने शोधाशोध सुरू करण्यात आली.  पाझर तलावा जवळ चारही जणांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर तलावात शोधाशोध करण्यात आली. पुण्याच्या चाकण येथे पाझर तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे दरम्यान,   स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चाकण पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चाकण येथील कडाचीवाडी (ता.खेड ) येथील पाझर तलावात मुले पोहायला गेली होती. त्यानंतर ही मुले परतली नसल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. अखेर तलावाच्या काठावर कपडे सापडल्याने  स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेत ओमकार बाबासाहेब हंगे (वय १, रा.बीड  ), श्लोक जगदीश मानकर (वय १३ वर्षे,रा. अमरावती),प्रसाद शंकर देशमुख( वय.१३  रा.नांदेड),नैतिक गोपाल मोरे ( वय.१३ वर्षे, रा. अकोला ) असे दुर्दैवी मुलांची नावे आहेत. मुलांच्या मृत्युने खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group