राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. तसेच, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात वेगवेगळी चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी हे एकत्रिकरण व्हायला हवं, असं उघडपणे बोलून दाखवलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आता याच चर्चेवर थेट भाष्य केलंय. कुटुंब म्हणून सुख-दुखा:च्या काळात आम्ही एकत्र येतोच, असं त्यांनी म्हटलंय.
अजित पवार यांनी पत्रकारांना वेगवेगोळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. याच वेळी भविष्यात अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही पक्ष एकत्र येतील का? असे अजित पवार यांना विचारण्यात आले. यावर बोलताना अजितदादांनी थेट उत्तर दिलं. माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे आले होते. घरातले कार्यक्रम असतील तर आम्ही जातोच, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच, विचारधारा वेगवेगळी आहे. पण कुटुंब म्हणून सुख दुखा:त आपण एकमेकांसोबत असतोच, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.