मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत राज्य सरकारने घेतला
मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत राज्य सरकारने घेतला "हा" महत्वाचा निर्णय
img
दैनिक भ्रमर
मुंबई :- मनोज जरांगे यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जरांगे यांच्या सुरक्षेसाठी त्यांना सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत. 

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने मनोज जरांगे यांना पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी 24 तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group