लक्ष्मण हाकेंचे ओबीसी आंदोलन ..... ; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
लक्ष्मण हाकेंचे ओबीसी आंदोलन ..... ; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
img
Dipali Ghadwaje
छत्रपती संभाजीनगर : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगेंनी टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याच मनोज जरांगेंनी यावेळी सांगितलंय. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.  

 काय  म्हणाले मनोज जरांगे?

भारतात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांची मागणी ते करतात मी माझ्या समाजावर ठाम आहे. ते दिशाभूल करत आहेत.  दिशाभूल करायची ती करू द्या. त्यांना आरक्षण संविधानाने दिले आहे. SC ST ला धक्का लागणार नाही त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याचं आंदोलन सरकार पुरस्कृत आंदोलन आहे.  आधीचे आणि आताचे आंदोलन पाहिल्यावर लक्षात येत आहे. आंदोलनाला एवढे लोक येतात त्यावरुनच  लक्षात येते. आंदोलकांना मी काही म्हणत नाही मात्र हे सरकार घडवून आणत आहे.
 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group