मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीआधीच अशोक चव्हाणांना दोन मोठे धक्के...
मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीआधीच अशोक चव्हाणांना दोन मोठे धक्के...
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना आगामी विधानसभा निवडणूकीआधीच धोक्याची घंटी मिळू लागल्याची चिन्ह दिसत आहेत. अशोक चव्हाण यांचे होमग्राऊंड असलेल्या नांदेडमध्ये भाजपला मोठा विजय मिळवून देऊ असा विश्वास अशोक चव्हाण यांना आहे. पण विधानसभा निवडणुकीआधीच नांदेडमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यात अशोक चव्हाण यांना लागोपाठ दोन मोठे धक्के बसले आहेत. याबद्दल जाणून घेऊया. 

मित्राने सोडली अशोक चव्हाणांची साथ 

लोकसभेनंतर बदलेल्या समीकरणामुळे अशोक चव्हाण यांची साथ देणारे अनेकजण आता त्यांची साथ सोडत आहेत. अशोक चव्हाण यांचे जवळचे मित्र आणि माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. शिवाय भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांच्यासोबत गेलेले माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे.

अशोक चव्हाण यांचे महाविद्यालयीन मित्र माजी राज्यमंत्री डी. पी सावंत यांनी देखील अशोक चव्हाण यांची साथ सोडली. डी. पी. सावंत हे काँगेस कडून दोनवेळा आमदार आणि एकवेळ राज्यमंत्री होते. लोकसभेत प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती. मात्र त्यांनतर आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून कोणासोबत जायचे हा निर्णय करू अशी प्रतिक्रिया  त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतांना  दिली होती. 

डी पी सावंत यांनी नांदेड उत्तर मधून काँगेसकडे उमेदवारी मागितली असून जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयात त्यांनी अर्ज दाखल केलाय. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी आणि नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता एकएक जन त्यांच्यापासून दूर होत आहे. भाजपमध्ये गेलेले माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी काँग्रेसकडून थेट उमेदवारीच मागितली आहे.  

तर दुसरीकडे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या परिवारातूनही बंड होताना दिसतंय. अशोक चव्हाण यांचे भाऊजी भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सून मीनल खतगावकर यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपसोबत बंड करण्याचा इशारा दिला. दोन वेळा आम्हाला पक्षादेश म्हणून माघार घ्यावी लागली. 2019 आणि 2024च्या लोकसभेत पक्षादेश आम्ही मान्य केला. परंतु आता जर पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची कार्यकर्त्यांची भुमिका आहे आणि ती भुमिका मला मान्य आहे असं मिलन खतगावकर म्हणाल्या. भाजपाने तिकीट दिलं नाही तरीही लढणार का असा प्रश्न विचारला असता , बीलकुल अस उत्तर मीनल खतगावकर यांनी दीले. 

दरम्यान मीनल खतगावकर यांनी नुकताच कार्यकर्त्याचा मेळावा घेउन स्वतःची उमेदवारी जाहिर तर केलीच शिवाय पक्षाने संधी न दिल्यास बंड करण्याचा इशारा दिलाय. माजी मंत्री डी. पी. सावंत आणि इतरांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्यानंतर आता मीनल खतगावकर यांनी बंडाचा इशारा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group