विधानसभेच्या आधी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले ''हे''आवाहन
विधानसभेच्या आधी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले ''हे''आवाहन
img
दैनिक भ्रमर
विधानसभेच्या  पार्श्वभूमीवर राजकारणतील  वातावरण चांगलेच तापले आहे .दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्नही ऐरणीवर आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला कुणाच्याही सभेला जाऊ नका, थेट असे आवाहन केले आहे . मनोज जरांगे पाटील हे बीडच्या बेलगाव येथे होते. यावेळी ते बोलत होते. 
 
आम्ही गरिबांसाठी लढत आहोत. तर ते आमच्यावर ट्रॅप लावत आहेत. माझ्यासाठी समाजापेक्षा कोणी मोठा नाही, असेल तर त्याला मी मोजत नाही आणि गिनतही नाही. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचे नाही, जो आरक्षण देईल त्याचा फायदा होईल. मी आमरण उपोषण पुकारले तरी कोणी भावनिक होऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.तसेच, मराठा समाजाने आधीच नेत्यांना गावबंदी केली होती. आता मराठा समाज सभेला नाही आला तर राजकीय पक्षांना बड्या नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमवणं कठिण होणार आहे.असा  इशारा हि त्यांनी या वेळी दिला . 

पुढे ते म्हणाले , माझं आमरण उपोषण 17 तारखेपासून सुरू होणार आहे. उपोषणापूर्वी आराम आवश्यक असतो म्हणून उद्यापासून कुठेही कार्यक्रमाला जाणार नाही. मी मुद्दाम आमरण उपोषण करत नाही. माझा मायबाप समाज आरक्षणाची आशेने वाट पाहत आहे. समाज म्हणतो आमच्या लेकरांची शेवटची आशा तुम्ही आहात. सरकार आरक्षण देणार नसेल तर मला माझ्या समाजासाठी लढावे लागणार आहे. माझा जीव गेला तरी हरकत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आपल्या विरोधात राज्यभर आंदोलन उभे राहत आहेत. आपल्यात फूट पाडली जात आहेत, भावनिक होऊ नका. आता 1500 रुपये दिल्याने तुमचं आयुष्य मार्गी लागणार नाही. ते आपले पैसे आहेत. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वावर विकले नाही. या सरकारने लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले. मग भाच्याचे काय? त्याला आरक्षण पाहिजे आणि दाजीचा काम करून तोंडाला फेस आला. त्याच्या मालाला भाव पाहिजे. आता दाजीला घेऊन मुंबईला जातो, मामाला ( मख्यमंत्री ) दाजीचा कचका माहीत नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

तसेच, महाराष्ट्रमध्ये मणिपूर होणार आहे. त्यांना दंगली घडवायच्या आहेत. पण तुम्ही शांत रहा आणि सावध रहा. त्रास देणाऱ्याला गपागप पडायचे आहे. मी एका एका काठीचा हिशोब घेणार आहेकितीही त्रास झाला तरी हटायचे  आणि मतदान केंद्रावर दाखवून द्यायचे आहे. मराठ्यांनी कोणाच्या सभेला जायचे नाही, असं आवाहनही त्यांनी केलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group