राज्यात उष्णतेची दुसरी लाट;
राज्यात उष्णतेची दुसरी लाट; "या" जिल्ह्यांना यलो अलर्ट
img
दैनिक भ्रमर


राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून दुसरी उष्णतेची लाट आली आहे. राज्यात सर्वाधिक ३८.८ तापमान सोलापूरमध्ये नोंदवले गेले आहे.

राज्यात येत्या पाच दिवसांत तापमानाचा पारा २-४ अंशांनी वाढणार आहे. कोकण व गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ही लाट राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा, विदर्भात तापमानात वाढ झाली आहे तर कोकणात उष्णेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

पुढील पाच दिवस मुंबई व उपनगर तसेच कोकणपट्ट्यात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज  ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला होता. ११ मार्च पर्यंत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट असून त्यानंतर हवामान उष्म व दमट राहणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group