बांगलादेशचे नवे प्रमुख युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन : हिंदूंच्या सुरक्षेचे आश्वासन
बांगलादेशचे नवे प्रमुख युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन : हिंदूंच्या सुरक्षेचे आश्वासन
img
दैनिक भ्रमर

बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. परंतु शेजारील देशातील अल्पसंख्याकांच्या आणि विशेषतः हिंदूंच्या सुरक्षेबाबत अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतातही याबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जात असून केंद्र सरकारने हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे. दरम्यान, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून हिंदूंच्या सुरक्षेचे आश्वासन दिले.

ट्विटरवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले, "प्राध्यापक मुहम्मद युनूस यांच्याशी दूरध्वनीवरून बोललो. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार. सद्यस्थितीवर विचार विनिमय केला. लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशसाठी त्यांनी पुनरुच्चार केला." त्यांनी बांगलादेशला पाठिंबा दिला आणि बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षा, सुरक्षा आणि संरक्षणाची हमी दिली."

दरम्यान , स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी  बांगलादेशातील परिस्थितीचा उल्लेखही केला होता. आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला आहे. खुद्द पीएम मोदींनी ही माहिती दिली. दोन्ही नेत्यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर विचार विनिमय केला. भारताने लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिल्याचे पीएम मोदींनी सांगितले.

याआधी बांगलादेशातील शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर, 8 ऑगस्ट रोजी मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली. युनूस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आणि बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.

गुरुवारी, भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, पंतप्रधान मोदी यांनी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त केली होती. शेजारील देशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत 140 कोटी भारतीय चिंतेत असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर आता युनूस यांनी सध्याच्या परिस्थितीबाबत पीएम मोदींशी चर्चा केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group