“माझी पोलीस सुरक्षा तात्काळ काढून घ्या आणि......” , सुप्रिया सुळेंचा मोठा निर्णय
“माझी पोलीस सुरक्षा तात्काळ काढून घ्या आणि......” , सुप्रिया सुळेंचा मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड तणाव येतो आहे. त्यातच राजकीय नेत्यांना संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी, माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. 

बदलापूरमधील दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. सुप्रिया सुळेंनी 'एक्स'च्या माध्यमातून ही विनंती केली आहे. 

हेही वाचा >>>> महाराष्ट्र पुन्हा हादरला...! आधी अपहरण अन् मग ... , नाशिकच्या सिन्नर तालुक्यात4 वर्षांच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर कृत्य

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

"महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय, हे स्पष्टपणे दिसत आहे." असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

"दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे हि सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत." अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.


"यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती." असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group