महत्वाची बातमी : बारावीचा निकाल लागला ; पदवी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
महत्वाची बातमी : बारावीचा निकाल लागला ; पदवी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी बारावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला. या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली. बारावीचा निकाल लागला आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकडे लागले आहे.

निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रसिद्ध महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू केल आहे. निकाल लागल्यानंतर लगेचच ऑनलाइन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्यामुळे पदवीसाठी चांगले कॉलेज मिळावे यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धडपड आता सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पदवी प्रवेश प्रक्रिया आजपासूनच सुरू झाली आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुणे शहरातील महाविद्यालयाने पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. बीए, बीकॉम आणि बीएससी या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय आजपासून प्रवेश प्रक्रिया राबविणार आहेत.

महाविद्यालयाने निकालानंतर लगेचच आपापल्या वेबसाईटवर प्रवेशांची माहिती प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्राची यादी वेळापत्रक आणि अर्जाची लिंक ही माहिती महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

यंदा उत्तीर्णचे प्रमाण कमी असल्याने पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याला अडचण येणार नाही. निकालात घट झाल्यामुळे पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाच्या पात्रता गुणांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

यंदाचा निकाल मागील वर्षाच्या तुलने १६ दिवस लवकर लागल्यामुळे महाविद्यालयांनी प्रवेशासाठी अधिक वेळ मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र महाविद्यालयांनी लगेचच प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना लगेचच निर्णय घ्यावा लागणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group